मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

निवडणुकांचे भाकित


निवडणुकांचे भाकित....
निवडणूक हां शब्द ऐकला की सामान्य माणसाचा हसरा चेहरा गंभीर होताना अनेकदा पाहायला मिळतो.वास्तविक पाहता लोकशाहीप्रधान देशात हां शब्द कानी पड़ताच कोनतेच प्रश्न
उमटन्याची गरज नाही परंतु प्रश्न उमटतात आणि उत्तर मात्र मतदान पेटीतच राहतात.सध्याच्या काळात तरी न आवडणारी प्रक्रिया म्हणजे निवडणूक...अशी जणू व्याख्याच होऊन बसली आहे निवडणुकांची किंबहुना व्याख्याच नव्हे तर शब्द जरी कानावर पडला तरी आश्वासनाची गाजरे नजरेसमोर अभी ठाकतात.मागील काळात ग्रामपंचायत निवडणुकांची  रणधुमाळी पार पडली.कुठे कांग्रेसने बाजी मारली तर कुठे बिजेपीने,बाजी तर कुठला ना कुठला पक्ष मारतोच हो,पण ती बाजी मात्र सत्ता काबिज करण्यासाठी आपल वर्चस्व स्थापन्यासाठी....
भारतात अनेक जवान देशभक्त होऊन ं गेले ज्यांनी राष्ट्रापती आपल कर्तव्य पूर्ण करून समाजाला बाजी मारण या शब्दाचा अर्थ शिकविला...शिवरायांच्या मावळ्यांनी तर आपल्या कर्तव्य आणि निष्ठेसाठी प्राणांची बाजी लावली मात्र कधीही जात - पात,पक्ष असा भेद ठेवला नाही.आता तर राजकारणात इतक्या पक्षांचा उदय  झालाय की,नेमका कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे हे सामान्य नागरिकांना  समजण कठिन बनत चाललय आणि पक्षांतर करन ही तर फॅशनच बनली आहे.या सगळ्या गिरगिट प्रवृत्तित बळी पड़तो सामान्य माणूस.
निवडणूक प्रक्रियेत मतदार हा राजा मानला जातो,मतदान करण्यासाठी 18 वर्ष पूर्ण आसन गरजेच आहे.प्रत्येक  नागरिकाने आपले मूलभूत हक्क  ओळखून मतदान करायलाच हव.देशाच्या हितासाठी आणि विकासासाठी  मतदान हे कारायलाच हवं आणि प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्काची जाण देखील झाली पाहिजे तेव्हाच लोकशाहीप्रदान  राष्ट्राच्या बळकटीकरणासाठी मतदारांचा हातभार लागला अस समजता येईल.
निवडणुुकीची व्याख्या करायची झाली तर एखाद्या संस्थेच्या वैध सभासदानकडून त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची किंवा प्रतिनिधिंची संस्थेने ठरविलेल्या पदासाठी जी निवड केली जाते त्या प्रक्रियेला निवडणूक म्हणुन संबोधतात.ज्या समाजात निवड करण्याचे स्वातंत्र्य असते त्या समाजात निवडणूक यंत्रणा सत्तेशी संबंध प्रस्थापित करतात.हे संबंध व्यवस्थितरीत्या प्रस्थापन्यासाठी उमेदवाराने देखील काही गोष्टी लक्षात घ्यायला ह्व्यात,ज्या जनतेच्या मतांची गरज आपल्याला भासते आणि असते,त्या जनतेला ही आपल्याकडून शहराच्या विकासासाठीच्या अनेक अपेक्षा असतात.आपल्याला मत देताना त्या माय - माऊलींच्या डोळ्यात पण अपेक्षेचे प्रतिक उमटलेले  पाहायला मिळत,सध्या काही गावात नगरसेवक पदासाठी रणधुमाळी  चालु आहे.अनेक उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे आहेत.जोरदार प्रचारसभा चालु आहेत.प्रचारासाठी खुप सुंदर पद्धत ही लोक वापरतात.मागील वर्षभरात आपण केलेल्या एक ते दोन विकासकामांना इतक उच्च स्थान देतात ,की घरोघरी जाऊन आपण वर्षातील 365 दिवसांत केलेल्या एक  - दोन कामांची गणना  ही इतर कोणीच करू शकत नाही अस एका क्षणापुरत वाटतं. याचवेळी ते भवीष्यात आपल्याला आसपास परिसरात काय सुधारणा होतील याचं ज्योतिषशास्त्र शिकवतात.काही काही सुशिक्षित तर थेट मतदानाच्या दिवशीच आणी अगोदरही थेट मतदानाचा पवित्र हक्क नागरिकांकड़ून पैसे देऊन खरेदी करतात.😢..एकीकडे जीवन जगताना येणाऱ्या अडचणी आणि दुुसरीकडे समाजात वावरन्याची भीती या दोन्हींच्या गर्तेत सापडलेला मनुष्य नेमका इथेच गोंधळात पडतो आणि याचठिकाणी आपला हक्क गमावून बसतो. काही काही ठिकाणी तर अस अनुभवायला मिळालय की,आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियां पुढे आहेत या उक्तिखाली राजकारणात स्त्रीयांनाही पुढे करून निवडणूक लढविली  जाते.दिसायला स्री सत्ताधीश दिसते.परंतु वास्तविकता ही असते की, त्या दिसणाऱ्या चेहऱ्यामागेसुध्दा निर्णय घेण्याची प्रक्रिया हां एक पुरुष करत असतो.ज्या नागरिकांच्या कल्याणाची ग्वाही आपण प्रचार करताना देत असतो...त्याच जनतेच्या कल्याणासाठी काही पदांवर आरूढ़ असणाऱ्या व्यक्तिंना त्या जनतेसमोर एक शब्दही कार्यक्रमात ,मीडियासमोर किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी व्यवस्थितपणे बोलता येत नाहीआणी जर बोललेच त्यातही  त्यांच्याच शौर्याची गाथा ऐकावी लागते.बऱ्याच ठिकाणी शैक्षणिक पात्रता आणि जनतेच्या विकासासाठी लागणारी योग्य विचारसरणी यातील एकही बाब या सरंजामदारांकड़े नसते. हे राहत असलेल्या वॉर्डमधील  नागरिकांचे प्रश्न नेमके काय आहेत, त्यांना काय हव आहे आपल्याकडून याचा विचार ही मंडळी कधी करणार ? हां कुलुपात बंदिस्त असलेला प्रश्न आहे.प्रश्न अनेक आहेत पण उत्तर देणार कोणीच नाही,असो,या  सगळ्या विचारातून एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते,निर्णय आणि प्रसंग कुठलाही असो,"हमेशा अपने दिल की सुनना"  ,,,.
कवी विंदा करंदीकरांची खुप छान कवितेच्या ओळी इथे सांगाव्याश्या वाटतात....
' असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर,
नजर रोखुनी नजरेंमध्ये  आयुष्याला द्यावे उत्तर....'
प्रियंका पुंड.